एमआयडीसी बारामतीत चोरीच्या दोन घटना उघड.. वेगवेगळ्या वायर कट करून तसेच सोलर केबल कट करून झाल्या होत्या चोऱ्या.. बारामती -: एमआयडीसी बारामती परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनांचा पोलिसांनी तपास करत उलगडा केला आहे. या कारवाईत अल्पवयीन मुलांसह भंगार व्यावसायिक आणि इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून काहींना अटकही करण्यात आली आहे. पहिल्या घटनेत डायनामिक्स कंपनीच्या आवारातून १३ मार्च रोजी सोलर प्लांटला जोडलेली सुमारे १५ हजार रुपये किमतीची कॉपर केबल चोरीस गेली होती. याबाबत १६ मार्च रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. […]
कोयत्याचा वार करत प्रेमी युगलाला लुटणारा आरोपी अखेर ‘जेरबंद
_तांदुळवाडी एलसी लेक परिसरातील घटना; बारामती पोलिसांचा सापळा ठरला भारी_ बारामती दि. १६ -:…
वाघोलीत एमडी ड्रग्सवर मोठी कारवाई; दोघे अटकेत – 31 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त.
वाघोली : वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून एमडी…
🚨 काळेपडळ पोलीस स्टेशनची मोठी कारवाई; बेकायदेशीर गॅस साठा व काळाबाजार उघड – 103 सिलेंडरसह आरोपी अटकेत 🚨
पुणे : काळेपडळ पोलीस स्टेशनच्या पथकाने बेकायदेशीर गॅस साठा व काळाबाजार करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मोठी कारवाई…
बारामतीत अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांवर अत्याचार; आरोपी मिलिंद जाधवला ४ वर्षांची सक्तमजुरी
प्रतिनिधी -: भीमराव कांबळे बारामती : अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत महिलांवर लैंगिक अत्याचार व आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली आहे. मिलिंद मदन जाधव (वय ५०, रा. धोपावे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) याने महिलांना “पैशाचा पाऊस पाडतो” असे खोटे आमिष दाखवून अघोरी पूजा आयोजित केली. या पूजेच्या नावाखाली महिलांना विवस्त्र अवस्थेत बसवून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले तसेच आर्थिक फसवणूकही करण्यात आली. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 405/2024 नुसार बी.एन.एस. कलम 64, 69, 318(4) तसेच काळी जादू प्रतिबंधक कायदा 2013 अंतर्गत कलम 2(1)(B), 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला […]
साथानकुलम कोठडी मृत्यू प्रकरणात ऐतिहासिक निकाल – ९ पोलिसांना फाशी थुथुकुडी (तामिळनाडू)
प्रतिनिधी -: नेहा पवार प्रतिनिधी :देशभरात खळबळ उडवणाऱ्या साथानकुलम कोठडी मृत्यू प्रकरणात न्यायालयाने ऐतिहासिक आणि कठोर निर्णय देत ९ पोलीस कर्मचाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. तब्बल सहा वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर आलेला हा निकाल देशातील कोठडीतील अत्याचारांविरोधातील एक मोठा टर्निंग पॉइंट मानला जात आहे. जून २०२० मध्ये लॉकडाऊनदरम्यान साथानकुलम येथील व्यापारी पी. जयराज (५९) आणि त्यांचा मुलगा बेनिक्स (३१) यांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते. दुकान काही मिनिटे जास्त वेळ उघडे ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. ताब्यात असताना दोघांवर पोलीसांकडून अमानुष छळ करण्यात आला. लाठ्या-काठ्यांनी करण्यात आलेल्या बेदम मारहाणीमुळे ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान बेनिक्सचा २२ जून तर जयराज यांचा २३ […]
पुणे पोलीस आयुक्तालयात “प्रोजेक्ट अस्मिता” उपक्रमाचे आयोजन
पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये Divyaj Foundation यांच्या वतीने महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी “प्रोजेक्ट अस्मिता” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी पाषाण येथील संस्कार हॉल येथे दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन Amruta Devendra Fadnavis (अमृता देवेंद्र फडणवीस), संस्थापक – दिव्यज फाउंडेशन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री Prajakta Mali (प्राजक्ता माळी) यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमास पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 🎯 दोन दिवसीय कार्यशाळेला सुरुवात “प्रोजेक्ट अस्मिता” अंतर्गत ६ एप्रिल […]
मु. पो. वाकी बुद्रुक, तालुका महाड, जिल्हा रायगड “माझं गाव माझं हायस्कूल वाचवा अभियान” परीक्षेच्या तोंडावर महाराष्ट्र शासनाने केली शाळा बंद. मुलांचा भविष्य धोक्यात
मुंबई प्रतिनिधी: महेश कदम महाड -: महाड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येत असून गेली पन्नास वर्षे सुरू असलेली शाळा शासनाच्या निर्णयामुळे अचानक बंद करण्यात आली असून या शाळेतील विद्यार्थी आता परीक्षेपासून वंचित राहणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचं कारण म्हणजे महाड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील कोकण एज्युकेशन सोसायटीचे श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालय वाकी बुद्रुक येथील शाळा शासनामार्फत बंद करण्यात आली आहे ३१ मार्च रोजी हा शासनाने निर्णय जाहीर केला असून ०१ एप्रिल पासून या शाळेवरती असणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या तालुक्यातील काही शाळांमध्ये करण्यात आले आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या येत्या ११ एप्रिल पासून सुरू होत आहेत […]
🚨 ‘पुरस्कार’च्या नावाखाली सरळ लूट! अनामत रक्कम उकळून व्यापाऱ्यांची फसवणूक – महाराष्ट्रात नवीन स्कॅमचा स्फोट 🚨
पुणे : पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ‘पुरस्कार गौरव’च्या नावाखाली सुरु असलेला फसवणुकीचा प्रकार आता उघड उघड आर्थिक लुटीमध्ये परिवर्तित झाला आहे. काही बनावट संस्था व स्वयंघोषित आयोजक व्यापारी, उद्योजक, दुकानदार व सामाजिक कार्यकर्त्यांना टार्गेट करून “राष्ट्रीय/राज्यस्तरीय पुरस्कार”, “ब्रँड आयकॉन”, “बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड” अशा मोठ्या पदव्या देण्याचे आमिष दाखवत आहेत. या माध्यमातून संबंधितांकडून “अनामत रक्कम”, “नोंदणी शुल्क”, “इव्हेंट फी” किंवा “प्रोमोशन चार्जेस” या नावाखाली हजारो ते लाखो रुपये उकळले जात आहेत. अनेक प्रकरणांमध्ये पैसे घेतल्यानंतर केवळ बनावट सर्टिफिकेट देऊन औपचारिक कार्यक्रम उरकला जातो, तर काही ठिकाणी आयोजक थेट संपर्क तोडून फरार होतात. ⚖️ भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत गंभीर गुन्हा: […]
हनुमान मंदिर देवस्थान उदापुर येथे हनुमान जयंती उत्सव सोहळ्या प्रित्यर्थ गोपाकाल्याचे आयोजनमो ठ्या उत्साहात झाला संपन्न
ब्रम्हपुरी / प्रतिनिधी : ब्रम्हपुरी तालुक्यातील उदापुर येथील हनुमान मंदिर देवस्थान परिसरात गोपाल काल्याचे समारोप कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला. दि. ०२ एप्रिल २०२६,गुरुवार रोजी झालेल्या.कार्यक्रमाकरीता माजी माजी आमदार अतुल भाऊ देशकर अध्यक्ष म्हणून स्थान भूषवले होते. त्याचप्रमाणे दीपक भाऊ उराडे, प्रमोद जी बानबले साहेब पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर, प्रकाशजी बगमारे प्रदेश सचिव भाजपा ओबीसी मोर्चा, प्रेमलालजी धोटे, मोरेश्वरची दर्वे निर्मल आफसेट ब्रह्मापुरी, कृष्णा भाऊ सहारे, सिद्धेश्वर जी भर्रे,अनिल जी नागतोडे, राकेश दुनेदार, सुभाष भाऊ नाकतोडे, आलाद जी सिनखेडे यांच्यी विषेश उपस्थिती होती. ह्या दोन दिवसाच्या कार्यक्रमात किर्तन व प्रवचन कार हरिभक्त परायण […]
११४७ एकर जमीन व्यवहार प्रकरण गाजलं; महसूल मंत्री बावनकुळे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र
फलटण -: राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवणारे ११४७ एकर शेतीजमीन व्यवहार प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून, त्यांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाऊन, पत्नी, मुलगी आणि मुलगा यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात शेतीजमीन खरेदी-विक्री करून ती हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकूण ११४७ एकर जमिनीचा व्यवहार संशयास्पद पद्धतीने झाल्याचे समोर आले आहे. या संदर्भातील माहिती काही पत्रकारांच्या व्हिडिओमधून पुढे आल्यामुळे हा मुद्दा अधिकच चर्चेत आला आहे. या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे विदर्भ प्रदेशाध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी थेट राज्य […]
🚨 धक्कादायक घटना! ‘गोल्डन मॅन’ रोहित पिसाळ यांच्यावर प्राणघातक हल्ला 🚨
“ठाण्यात प्राणघातक हल्ला: आरोपींना अटक न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा” ठाणे, ३ एप्रिल २०२६ (प्रतिनिधी):‘गोल्डन मॅन’ म्हणून ओळख असलेल्या रोहित पिसाळ यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी काल मध्यरात्री (३ एप्रिल) प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी मांडवी पोलीस स्टेशन, ठाणे येथे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे. हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलिसांकडून विविध दिशांनी तपास केला जात आहे. या घटनेमागील नेमका हेतू काय, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. दरम्यान, या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत रिपब्लिकन संघर्ष सेनेचे कार्याध्यक्ष तसेच […]
🚨 नातेपुतेत भीषण अपघात : कालव्यात कार कोसळून तिघांचा मृत्यू, चालक बचावला 🚨
प्रतिनिधी – नेहा पवार नातेपुते (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात फलटणमधील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईहून फोंडशिरसकडे जाणारी इर्टिगा कार जुन्या पालखी महामार्गावरील निरा उजव्या कालव्याच्या पुलावरून थेट पाण्यात कोसळली. ही घटना पहाटे सुमारे पाचच्या सुमारास घडली. या अपघातात प्रीती टिळेकर, हनुमंत जठार आणि मंजू जठार (सर्व रा. फलटण) यांचा जागीच मृत्यू झाला. चालक सुनील टिळेकर हे मात्र सुदैवाने बचावले. या घटनेमुळे संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, पुलावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. त्यानंतर कारने पुलावरील कठडा तोडत थेट कालव्याच्या खोल पाण्यात झेप घेतली. […]

